Wednesday, August 8, 2018

BJP सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?


आजपर्यंत आरक्षणाच्या व कोपर्डीच्या बहिणीला न्याय मिळावा म्हणून मराठा समाजाचे एकूण ५८ मोर्चे अगदी शांततेत व नियोजनबद्धरीत्या मोर्चे निघाले. पण हे सरकार फक्त वेळकाडूपणा करत आहे. या वेळकाडूपणामुळेच या आरक्षणाचा पहिला बळी काकासाहेब शिंदे यांच्या रूपाने गेला. आतापर्यंत एकून १५ जनांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.म्हणूनच आता या फडणवीस सरकारचे डोके ठिकाणावर आहे का म्हणण्याची वेळ आली आहे. परवाच अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती उदयनराजे भोसले सरकार यांनी पुण्य्यात पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला जर हे मोर्चे हाताबाहेर गेले तर मराठ्यांना कोणीच रोखू शकणार नाही. या पत्रकार परिषदेमध्ये महाराजांनी मराठा आरक्षण तसेच धनगर आरक्षण सरकारने त्वरित द्य्यावे अशी मागणी करून आपण खरच छत्रपती कशे असतात याची प्रचीती करून दिली.अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज या आंदोलनाचे नेतृत्व छत्रपती उदयन महाराजांकडे द्य्यावे अशी मागणी करत आहे पण महाराजांनी यास स्पष्ट नकार देत या मोर्चाचे नेतृत्व मी नाही आणि कोणीच करत नसून याचे नेतृत्व आंदोलनकरतेच करत असल्याची जाणीव करून दिली. तरी या बिनडोक सरकारने लवकरात लवकर याचा विचार करून मराठ्यांना आरक्षण द्यावे अन्यथा मराठ्यांना इतिहास कसा करावा हे चांगलाच ठाऊक आहे. उद्या होणारया महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे या सरकारला मराठा समाजाची खरी ताकत कळून येईल.किमान मराठे आता रिकामे रस्त्यावर उतरले आहेत हे नशीब समजावे अन्यथा या बंदनंतर मराठे हातात खानदानी तलवारी गेऊन रस्त्यावर पडतील. व जेव्हा म्यानातून तलवारी बाहेर येतील तेव्हा नक्कीच नवीन स्वराज्य स्थापन होऊन इतिहास निर्माण होईल.

Sunday, January 14, 2018


|| पानिपत युद्धात स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या मर्द मराठ्यांना त्रिवार मानाचा मुजरा ||
आज १४ जानेवारी १७६१ पानिपतचे युद्ध झाले त्या निमिताने आजचा विशेष लेख, हे युद्ध मराठे व
अहमदशा अब्दाली यांच्यात झाले याला आज २५७ वर्षे पूर्ण झाली ,या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला तरी अहमदशहा अब्दाली व वाय्यवेकडील बाद्शाहणी याचा चांगलाच धसका घेतला व यांनंतर कोणत्याही वाय्यवेकडील बादशहाणी आक्रमण केले नाही, आणि यातच खऱ्या अर्थाने मराठ्यांचा विजय झाला. अठराव्या शतकातील सगळ्यात मोठी लढाई अस वर्णन या लढाईच केल जात.मुघलांचा शेवटचा काळ हा १६८०-१७७० चा होता आणि त्याच वेळी त्यांचा ताब्यातील सगळ्यात मोठा बुभाग हा मराठ्यांच्या ताब्यात होता. या पानिपतच्या युद्धात अहमदशा च्या बाजूने एक लाख सैनिक व मराठ्यांच्या बाजूने ६० ते ७० हजार सैनिक उतरले होते.
या युद्धात मराठे उपाशी पोटी उतरले होते सुरवातीला मराठे आघाडीवर होते पण उपाशी मराठ्यांना शेवटी हार मानवी लागली आणि या युद्धात सगळ्यात जास्त मराठ्यांची हानी झाली.मात्र या युद्धाने जगासमोर मराठ्यांचा आणि महाराष्ट्राचा धाक निर्माण झाला. आजच्या या युद्धात स्वराज्यासाठी आपल प्राण अर्पण केलेल्या मराठा मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा.