Monday, January 31, 2011

शिवछत्रपतींची आरती

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या अंगचे सर्व गुण आणि सर्व शक्ती केवळ देशभक्तीच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मातृभूमीच्या चरणी वाहिल्या. सावरकर सर्वप्रथम देशभक्त होते आणि नंतर महाकवी, समाजसुधारक, लिपीसुधारक, रणझुंजार नेते होते. सावरकरांचे हे जाज्वल्य राष्ट्रप्रेम त्यांच्या बालपणापासूनच स्पष्ट होत होते. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात आर्य संघ या नावाच्या भोजन संघामध्ये प्रत्येक आठवड्यास म्हटली जावी म्हणून सावरकरांनी श्री शिवाजी महाराजांची आरती लिहिली.
जयदेव जयदेव जय जय शिवराया। या या अनन्यशरणा आर्या ताराया।।आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला। आला आला सावध हो शिवभूपाला।। सद्गदिता भूमाता दे तुज हाकेला। करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला?।। श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी। दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी। ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळलता। तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?।। त्रस्त अम्ही, दीन अम्ही शरण तुला आलो। परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो। साधु परित्राणाया दुष्कृति नाशाया। भगवन भगवद्गीता सार्थ कराया।। ऐकुनिया आर्यांचा धावा गहिंवरला। करुणोक्तें स्वर्गी श्रीशिवनृप गहिंवरला। देशास्तव शिवनेरी घेई देहाला। देशास्तव रायगडी ठेवी देहाला। देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला। बोला तश्रीमत्शिवनृप की जय बोला।।

आग्र्याहून सुटका

आग्र्याहून सुटका

इ.स. १६६६ साली औरंगझेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत सहा वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्‍यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदार्‍या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्‍या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगझेबाच्या हातात पडायचे नाही.
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.

मिर्झाराजे जयसिंह प्रकरण

मिर्झाराजे जयसिंह प्रकरण

इ.स. १६६५. औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वत: आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगझेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.

मुघल साम्राज्याशी संघर्ष

मुघल साम्राज्याशी संघर्ष

मुघल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगझेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.

शाहिस्तेखान प्रकरण

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.

घोडखिंडीतली लढाई

 पावनखिंडीतील लढाई
पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वत: लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील. शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले. शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.

सिद्दी जौहरचे आक्रमण

सिद्दी जौहरचे आक्रमण

अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.

आदिलशाहीशी संघर्ष

 

अफझलखान प्रकरण

आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्याप्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलाखानने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.
शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.

लढाऊ आयुष्य

लढाऊ आयुष्य

शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य लढाया करण्यात गेले. प्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोपदेखील ते घोड्यावरच आणि केवळ तीन-चार तास घेत असत.

सुरूवातीचा लढा

पहिली स्वारी - तोरणगडावर विजय

इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.

शहाजीराजांना अटक

शिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्‍यांनी बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.
शिवाजीराजांनी मुघल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.

जावळी प्रकरण

आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.

मावळ प्रांत

मावळ प्रांत

सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला "मावळ" म्हणतात. पुण्याखाली १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.

बारा मावळ

  • पवन मावळ
  • आंदर मावळ
  • कानद मावळ
  • मुठाखोरे
  • गुंजण मावळ
  • हिरडस मावळ
  • पौड मावळ
  • रोहिड खोरे

शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी

शिवाजी महाराजांचे सरसेनापती

छत्रपती


छत्रपती शिवाजीराजे भोसले
छत्रपती
Shivaji1.jpg
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे चित्र
Shivaji Maharaj Rajmudra.jpg
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची राजमुद्रा
अधिकारकाळजून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेकजून ६, १६७४
राज्यव्याप्तीपश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणि
उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानीरायगड
पूर्ण नावशिवाजीराजे शहाजीराजे भोसले
पदव्यागोब्राह्मणप्रतिपालक
जन्मफेब्रुवारी १९, १६३०
शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यूएप्रिल ३, १६८०
रायगड
उत्तराधिकारीछत्रपती संभाजीराजे भोसले
वडीलशहाजीराजे भोसले
आईजिजाबाई
पत्नीसईबाई,
सोयराबाई,
पुतळाबाई,
काशीबाई,
सकवारबाई
संततीछत्रपती संभाजीराजे भोसले,
छत्रपती राजारामराजे भोसले
राजघराणेभोसले
राजब्रीदवाक्य'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलनहोन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??

hindvi


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
Shivaji Maharaj
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, 
श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।
पुरंदर आणि शक्ति 
पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत।
वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। 
जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील।
धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई 
।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर तुच्छ 
केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा 
केली
या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, 
तुम्हा कारणी।।
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।
कित्येकाला 
आश्रयो जाहला ।
शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्ध, संपन्न असे ‘आंनदवनभुवन’ च निर्माण 
केले होते. त्या आनंदवनभुवनाचे वर्णन समर्थ रामदासांनी पुढील शब्दात केले आहे. हे 
काव्य म्हणजेच छत्रपतींनी पार पाडलेले ‘इतिकर्तव्य’ होय.
स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी, तीर्थासी 
तुळणा नाही।
आनंदवनभुवनी।।
त्रैलोक्य चालील्या फौजा, सौख्य बंध विमोचने, 
मोहीम मांडिली मोठी।
आनंदवनभुवनी।।
येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमे , संतोष 
मांडला मोठा।
आनंदवनभुवनी।।
भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा, 
भक्तासी दिधले सर्वे।
आनंदवनभुवनी।।
येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखती, 
सामर्थ्य काय बोलावे।
आनंदवनभुवनी ।।
उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, 
जप-तप अनुष्ठाने
आनंदवनभुवनी।।
बुडाली सर्वही पापे, हिंदुस्थान बळावले, 
अभक्तांचा क्षयो 
झाला।
आनंदवनभुवनी।।
आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।

राजे पुन्हा जन्मास या.



जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या

राजे पुन्हा जन्मास या

शिरि शिरपेच हाती समशेर शोभती

अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती

हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती

भगवा धरुन हातात या..राजे पुन्हा जन्मास या. || १ ||



कावा गनिमी करुनी, धर्मरक्षिण्यास

फाडिले अफजल खानास तसा

आज सरकार म्हणे त्यास फासी नको.

फाडण्या पुन्हा खानास या

राजे पुन्हा जन्मास या. || २ ||



नाव घेती तुमचे किती, परी

चरित्र कुणा का ना उलगडे तरी?

राजकारण करी, ती नावावरी,

शिकवण्या धडे राजकारणाचे या

राजे पुन्हा जन्मास या. || ३ ||



पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माणास या

मराठि अस्मिता जागविण्यास या

नको बांधणि किल्ल्याची आम्हा आता

माणुस मराठि एकदा जोडण्यास या

राजे पुन्हा जन्मास या. || ४ ||



जाणत्या राजास ला़ख्-लाख मुजरा असो

स्विकारण्या माझ्या मुजर्यास या

राजे पुन्हा जन्मास या.

जन्म घ्या तुम्हि जन्म घ्या

राजे पुन्हा जन्मास या. || ५ ||


जय महाराष्ट्र ...

* पानिपतचा समरप्रसंग *


* १४ जानेवारी १७६१ रोजी पहाटे मराठा सैन्य यमुनेच्या रोखाने निघाले.

* युद्धाची सुरवात सकाळी ९ ते १० च्या दरम्यान झाली. गारदीच्या तोफा गरजल्या व समोर रस्ता बनविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पठाणांवर प्रभाव पडला नाही.


* गारदींच्या जोरदार हल्ल्यासमोर रोहिले व बर्खुदारखानाचा निभाव लागेना व त्यांचे हजारोंनी सैनिक मरून पडले. गारदीमागे दमाजी गायकवाड व विठ्ठल शिवदेव यांचे घोडदळही घुसले. मात्र, जखमी होऊन त्यांना माघार घ्यावी लागली.

* त्यानंतर सदाशिवराव भाऊंच्या हुजुरातीसमोर वजीर शहावली खानाच्या पथकाशी युद्ध लागले. मराठ्यांचा हल्ला इतका यशस्वी होता की दुराणींना आपण युद्ध हरलो, असे वाटू लागले.


* दुपारीच दोनला माघारी आलेल्या वजीराच्या सैनिकांमुळे मराठ्यांवर दबाव वाढला. तोफखाना बंद पडून इब्राहिम खान जखमी.


* याचवेळी एक गोळी विश्‍वासरावांना लागल्याने ते मृत्युमुखी पडले. भाऊसाहेब घोड्यावरून दुराणी शहाला मारण्याच्या उद्देशाने पुन्हा त्वेषाने लढू लागले.


* विश्‍वासराव पडल्याची बातमी पसरल्यावर मल्हारराव होळकर व शिंदे मागून रणांगण सोडून मार्ग काढीत दिल्लीकडे निघाले. भाऊसाहेबांवर नव्या दिशेने हल्ला झाला.


* दुराणी शहाने स्वतःकडील सहा हजार ताज्या दमाचे सैन्य भाऊसाहेबांच्या दिशेने पाठविले. भाऊसाहेबांनी निकराने हल्ले चढविले. पठाण सैन्याच्या गर्दीत लढताना त्यांना शेवटी नाना फडणीसाने पाहिले.


* सायंकाळी चार वाजता मराठा सैन्य जणू अदृश्‍य झाले. युद्धात व युद्धानंतर एकूण ८० हजार ते १ लाख मराठे मारले गेले.

पानिपतचा समरप्रसंग (दैनिक सकाळ)

 

Saturday, January 29, 2011


१७ ऑगस्ट १६६६... आग्र्याहून सुटका... एक थरारक पलायन...


१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले. आजही तुम्ही कधी पुरंदरला गेलात तर मुरारबाजींचा पुतळा बघून त्यांच्या शौर्याची गाथा कळते. किल्लेदाराबरोबर किल्लाही पडला.

तह व्हायच्या आधी शिवाजीराजांनी मिर्झाराजाला एक पत्र पाठवले होते. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."
सर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती म्हणून त्याने बादशहाला कळवले की 'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.' मिर्झाराजाने राजांना आग्रा येथे जाण्यास तयार केले आणि त्याप्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका न ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.


................. आणि 'दिवाण-ए-खास' मध्ये जे घडले तो इतिहास आहे. जोगळेकर त्यांच्या सह्याद्री ग्रंथात म्हणतात,
''आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."

त्या दिवशी नेमके काय घडले हे अधिक जाणून घेण्यासाठी येथे जा ... Threat to Life ...

परिणाम ठरलेला होता. राजे नजरकैदेत टाकले गेले. अर्थ स्पष्ट होता. मृत्यू.... कधी? केंव्हा? कसा? काहीच ठावूक नव्हते. दख्खनेतून जयसिंगने 'शिवाजीस मारू नये. तसे केल्यास इकडे परिस्थिती हाताबाहेर जाईल पण इकडे सुद्धा येऊ देऊ नये' असे पत्र औरंगजेबाला पाठवले. औरंगजेबाने राजांना काबुल मोहिमेवर पाठवायचे ठरवले. अर्थात राजांनी बादशहाची कुठलीच गोष्ट मानायला साफ नकार दिला. परिस्थिती अधिक बिकट होत होती. कुठल्याही क्षणी आपला मृत्यू समोर येईल हे राजांना ठावूक होते. अखेर एक योजना आखली गेली. थरारनाट्य ठरले. राजांबद्दल आग्र्याच्या बाजारात अफवा पसरत होत्या. खुद्द जसवंतसिंग औरंगजेबाला सांगत होता. 'शिवाजीकडे दैवी शक्ती आहे. तो १४-१५ हात लांब उडी मारू शकतो. एका फटक्यात ४०-५० कोस अंतर तो चालून जातो.' दुसऱ्या दिवसापासून बादशाहने स्वतःभोवतीची सुरक्षा अधिक वाढवली. राजांबरोबर असलेले संभाजीराजे मात्र नजर कैदेत नव्हते. त्यांना फिरायला मुभा होती. त्यांच्या सोबत सर्जेराव जेधे आग्र्याबद्दल इत्यंभूत माहिती काढत. योजना हळूहळू पुढे सरकत होती. ७ जून रोजी राजांनी सोबत असलेल्या सर्व सेवक आणि सैन्याला परत दख्खनेत पाठवून दिले. सोबत होते फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद, सर्जेराव, रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर आणि मदारी मेहतर.



१७ ऑगस्ट १६६६. दिवसा-ढवळ्या, १००० सैनिक खडा पहारा देत असताना राजे नजरकैदेतून पसार झाले. ते नेमके कसे निसटले ह्याबाबाबत कुठलाच ठोस पुरावा उपलब्ध नाही. 'मिठाईचा पेटारा'ची कथा जी काल्पनिक आहे ती मुघली कागदपत्रांमधून घेतलेली आहे. औरंगजेबाने शोध मोहीम काढली. पण आता खूप उशीर झाला होता. एक थरारक पलायन यशस्वी झाले होते. राजांनी मुघलांची शेवटची चौकी २० ऑगस्ट रोजी चक्क खोटे दस्तक दाखवून पार केली. चौकीदार होता लातिफखान. औरंगजेबाला जेंव्हा हे कळले तेंव्हा त्याने 'लातिफखान बेवकूफ है' असे उद्गार काढल्याची नोंद मुघल कागदपत्रांमध्ये आहे. आता संभाजीराजांना मथुरेला विश्वासरावांकडे ठेवून शिवाजीराजे वेगाने पुढच्या मार्गाला निघाले. आपल्या ९ वर्षाच्या मुलाला मागे ठेवून जाताना त्यांना काय वाटले असेल...!!! पण एकत्र जाणे धोक्याचे होते तेंव्हा त्यांना काळजावर दगड ठेवून तो निर्णय घ्यावा लागला असणार. तिकडे आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार फुलौतखानाला सापडले. शिवाजीराजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजीराजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते. राजांनी थेट दख्खनेचा रस्ता न धरता मुघलांच्या आवाक्याबाहेरचा मार्ग घेतला होता. मथुरेवरून अलाहाबाद - बनारस - गया - गोंडवन आणि तिथून गोअळकोंडा. वाटेत ठिकठिकाणी शत्रूशी त्यांची गाठ पडली. त्यांनी संन्याश्याचा वेश धारण केला. जास्तीतजास्त प्रवास पायी केला. अथक परिश्रम करून राजे दख्खनेत पोचले. पण अजून संभाजीराजे मथुरेमध्येच होते. शिवाजीराजे राजगडी पोचल्याची बातमी आग्र्याला पोचली तेंव्हा मुघलांची शोध मोहीम थांबली. रस्ता अधिक सुरक्षित झाल्यावर विश्वासराव संभाजीराजांना घेऊन खुद्द राजगडी पोचले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती.


हताश झालेला औरंगजेब आता फारसे काही करू शकत नव्हता. आता काय कधीच काही करू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच सल होता. 'एक क्षणाच्या निष्काळजीपणाचं पर्यावसान शिवाजीच्या पलायनात झाल्यामुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागली आहे. मराठ्यांबरोबरच्या युद्धाला आता कधीही अंत नाही हे तो उमगला होता.'

३१ वर्षानंतर '२१ फेब्रुवारी १७०७' रोजी नगर येथे म्हातारा बादशहा हाच सल घेऊन 'अल्लाला प्यारा' झाला. दख्खन तो कधीच जिंकू शकला नाही...

स्वराज्याची पहिली लढाई


स्वराज्याची पहिली लढाई - ८ ऑगस्ट १६४८

१६४८ च्या सुरवातीला आदिलशाहीचे पुरंदर आणि सिंहगड असे मात्तबर किल्ले शिवाजी राजांनी ताब्यात घेतले. अखेर शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेउन आदिलशाहने जुलै १६४८ मध्ये शिवाजी राजांवर हल्ला करण्याचे ठरवले. खुद्द शहाजी राजांची साथ असल्याशिवाय शिवाजी हे धाडस करणार नहीं अशी खात्री असल्याने आदिलशहाने शहाजी राजांना २५ जुलै १६४८ रोजी कपटाने कैद केले आणि शहाजीराजांच्या बंगळूरप्रांती आदिलशाही फ़ौज धाडली. तर एक फ़ौज पुण्याच्या दिशेने चालून आली. शहाजीराजे खुद्द कैदेत होते मात्र बंगळूरवरचा हल्ला त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) यांनी यशस्वीपणे परतावला.

दुसरीकडे अवघ्या १८ वर्षाचे शिवाजी राजे आदिलशाही सैन्याला भिडायला सज्ज झाले होते. पुणे - सातारा मार्गावर असणाऱ्या खळत-बैलसर येथे स्वराज्याची पहिली मोठी लढाई झाली. ही लढाई ८ ऑगस्ट १६४८ रोजी झाली. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या फौजेचा शिवाजी राजांनी सपशेल पराभव केला. फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द शिवाजीराजे चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी दुसऱ्या एका लढाइत 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले.

आदिलशाहीचा पहिला मोठा हल्ला मराठा फौजेने परतावला होता. मात्र नुकतेच बाळसे धरलेल्या स्वराज्यापुढील धोका टाळण्यासाठी आणि शहाजीराजांची सुटका करण्यासाठी शिवाजीराजांनी सिंहगड आदिलशाहीला परत केला.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.

 ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो .. ज्या युग पुरुषाने स्थापन केलेले स्वराज्य आपल्या खांद्यावर ज्यांनी अगदी लीलया पेलले .. वाढवले .. इतिहासामधील एक अदभूत व्यक्तिमत्व, म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
ज्या माणसाने वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.
इतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी - दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली
शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, अतिशय दूरदर्शी पणाने त्यांनी सागरी शक्तीचे महत्व ओळखून आरमारही स्थापना केली होती, पुढे याच सागरी आरमाराला चौपटीने वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. चंगेखान नावाच्या अरबी सरदार कडून नाव नवीन युद्ध नौका तयार करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले, मराठा आरमार अतिशय प्रबळ आणि प्रभावी बनवले.

टोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही . तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.

याच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव "सात-सतक" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही . भाषेचे प्रचंड प्रभुत्व असलेला हा राजा.

खुद्द औरंजेब दक्खन स्वारीवर आलेला असतांना त्या पापी औरंग्याला तब्बल वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच संभाजी राजांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते.केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला.
स्वकीयांनीच विश्वास घात करून संभाजी महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले , आणि आतिशय निर्दयपणे त्यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करताच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. खर तर जीवावर बेतल्यावर मानसे कसे स्वाभिमान शून्य होतात याची उदाहरणे बरीच आहेत पण संभाजी राजांनी स्वतः ला हा काळिमा लाऊन घेतला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा पुढे आपली माण झुकवली नाही.

संभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही.

याच संभाजीचा चारित्र्य हनन करण्याचे काम आमच्याच काही हरामखोर बखरकारांनी आणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी राजांचा राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच. आणि ज्या जिजाऊ ने शिवबा घडवला त्याच जीजौंच्या संस्कारात वाढलेला शंभू बाळ कसा काय रंगेल ठरवला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वराज्यचे संस्थापक तर याच महाराष्ट्राचा दुसरा छत्रपती म्हणजेच संभाजी महाराज हे या स्वराज्याचे संरक्षक म्हणून होते.

उगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश जसा घरा घरा पर्यंत पोचतो त्याच प्रमाणे माझ्या या शूर शंभू राजांचा इतिहास आमच्या घरा घरा पर्यंत पोचावा असे आवाहन आपल्याला जिजाऊ.कॉम परिवार तर्फे करण्यात येत आहे.

जय जिजाऊ .. जय शिवराय .. जय संभाजी

सेर सिवराज है



सेर सिवराज है


सेर सिवराज है
इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||||
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||||
-कविराज भूषण
अर्थ :
जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चीत्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात
 

Sunday, January 23, 2011

जागता राजा- संभाजी

मला आवडलेला एक सुंदर लेख----
--------------------------------------------

सुराज्याच्या निर्मितीसाठी राजे शिव छत्रपतींच्या मोहिमा सतत राबत होत्या. प्रजेला जाणता राजा मिळाला होता. हिंदवी स्वराज्याच्या सीमा रुंदावत होत्या. महाराज राज्यविस्तर आणि रयतेच्या हितासाठी रातदिन एक करीत होते. आईविना राजपुत्र संभाजी आजी जीजाऊच्या छत्रछायेखाली मोठे होत होते. आजीचं वार्धक्‍य, पुतळाईचं प्रेम राजपुत्र संभाजीला मोठं करण्यात जीवाचं रान करीत होतं. अधेमेधे पित्याचा वरदहस्त बापाच्या काळजीनं डोक्‍यावरून फिरत होता. त्यात युद्धाचं शिक्षण, संस्कृतचा अभ्यास, हिंदी भाषेचे ग्रहण, शरीर कसरत यात संभाजीचे सात वर्ष कसे निघून गेल, हे कळलंच नाही. वयाच्या आठव्या वर्षी मात्र फार मोठा अनुभव संभाजीच्या वाट्याला आला. राजकारणाच्या डावपेचात छत्रपती शिवाजी राजांसोबत त्यांचा वारस शंभू बाळाला औरंगजेब बादशहाच्या नजर कैदेत जाव लागलं. कोवळ्या मनाची पाटी चाणाक्ष राजनितीचे अक्षर उमटवून घेण्यास पित्याबरोबर सज्ज होती. अगदी वयाला न शोभणाऱ्या धैर्य धाडसाच्या धारणेसाठी दिल्ली दरबारातील अनुभव मनाच्या गाभाऱ्यात अमीट कोरल्या गेले. आग्रा किल्ल्यातील तुरुंगवासात पित्याचा अमूल्या सहवास आणि प्रतयक्ष कृती शिक्षण संभाजीच्या भविष्यातील मुत्सद्‌देगिरीची शिदोरी ठरत होती. काय अवस्था होत असेल पित्याची आणि त्या बाळ शंभूंची सर्व घटनांचा अमीट ठसा त्या बाळमनावर, त्याच्या हृदय पटलावर उमटत होता. वडिलांची चतुराई, कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याचं अद्वितीय कसब, धीरता, गंभीरता, मृत्यूच्या दाढेतून सुखरूप सुटण्याचा जीवघेण प्रसंग, यातुन दुर्मिळ जीवनविद्येची संजीवनी अपसुक प्राप्त होत होती. शिवाजी महाराजांसारख्या युग पुरूषाच्या सर्व क्रीया कलपांचा प्रत्यक्षदर्शी केवळ आठ वर्षाचा कोवळा शंभू एकाच वेळी अनेक विद्यांच्या गृहपाठातून तावून सुलाखून तयार होत होता. ह
े संस्कार जगात एकमेव आणि अनाकलनीय ठरावेत, धैर्य, निर्भिडता, चातुर्य, मुत्सद्‌देगिरी, जीवाची पर्वा न करता हे सर्व रयतेच्या भल्यासाठी कष्ट सहन करण्याचे अमौलीक गुण संभाजींनी आत्मसात केले. तेही प्रत्यक्ष आपल्या पिताश्रींकडून धन्य ते बालपण धन्य ते संस्कार.
पौगंडावस्था आता कुठे येऊ घातली असतांना अवघ्या 15 व्या वर्षी 10,000 ची फौज घेऊन मुलुखगिरीला राजपुत्र संभाजीला जावं लागलं. राजपुत्राची पूर्ण ओळख एव्हाना शिवाजी राजांना झाली होती. सिंहाच्या छाव्याला सावजापासून जास्त वेळ रोखू नये. पराक्रमाची कथा सुंदर असली तरी ती प्रतयक्ष अनुभवल्या शिवाय शूरवीर होता येत नसते. "युद्धस्त वार्ता रम्या' असं वर्णन करणारे शब्द समूह जुळवून त्यातून कथाकार निर्माण करायचे नव्हते. राजांना युद्घाचा प्रत्यक्ष अनुभव देवून महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा वारस रयतेला निर्माण करवून द्यायचा होता. समक्ष, अगदी स्वत:सारखा नव्हे, काकणभर अधिकच, युद्ध म्हणजे सर्वशक्ती, युक्ती, बुद्धीच्या संयोगाने, शरीर, मन-बुद्धी-आत्मा एकवटून शत्रूशी द्यावयाची पराक्रमी झूंज. काळ-काम-वेग चतुराई सर्व पणाला लावून शत्रुला नामोहरम करणं म्हणजे युद्ध कुठल्याही गणिताची एकही पायरी चुकली की शीर धडापासून वेगळ म्हणजे जीव घेताना, जीव अर्पण कराव लागू शकतो, यासाठी शारीरिक क्षमतेबरोबर अष्टावधान जपत स्वत: वार न लागू देता शत्रूवर वार करणं म्हणजे युद्ध, युद्धकरी 6वारकरी' असलयाशिवाय विजयी होऊ शकत नाही. युद्धात जय मिळवून परतु शकत नाही, हा कोवळा राजपूत्र सैन्य, रसद, व्यूहरचना, मनोबल, प्रशासन, युद्धनिती, हेरगिरी, खबरे, हुजरे, खेमे, तंबू, तलवारी, तोफखाना, दारूगोळा, गुप्तात, गनिनी, या सर्व युद्ध सायुज्जतेच्या शासन प्रशासनात एवढा तरबेज निघाला की आदिलशाही राज्यात घूसून गोवळकोंडा आणि आजूबाजूचा भूभाग काबीज केला. हुबली व रायबागची मोहीम फत्ते केली.
खानदेश आणि गुजरात व स्वारीची मोहीम विजयी करून शंभू राजांनी शत्रूवर जबरदस्त दरारा निर्माण केला. संभाजीच्या नावाने शत्रू रणांगण सोडू पळू लागलेत. मरणाच्या भितीने अनेकांनी शरणागती पत्करली. संभाजीच्या या वयातील शौर्याला जगाच्या इतिहासात तोड नाही, जोड नाही, शौर्य आणि पराक्रमाची कीर्ती दूरवर पसरू लागली. त्याची दखल इत्तिहासकारांना आणि प्रामाणिक बखरकारांना घ्यावीच लागली. विदेशी लेखकांनीही त्यांच्या अजोड शौर्य आणि पराक्रमाची नोंद घेतली आहे. प्रजेला शिवाजींचा खरा वारस लाभल्याचा आनंद स्वर्णीमच ठरावा. प्रजेत त्यामुळे या तेजस छाव्याची प्रतिमा उंचावली गेली. सैनिकांचं मनोबल प्रचंड उंचावल्या गेलं. संभाजीच्या सैन्यात जाण्यासाठी तरूण आणि जाणते वीर पुढे स्पर्धा करू लागले. ही त्या वयातील शौर्यवान, धाडसी, युद्ध निती निपूण वीर राजपुत्र संभाजीला देशातील मर्दांनी दिलेली पावती होती. शंभू राज्याचं नेतृत्व स्वीकृत झालं.
एकीकडे युद्धनिपूण नेतृत्वगुणसंपन्न बलशाली संभाजीची युद्धकठोरता, कर्मठता, युद्धनितीकुशलता ज्या वयात प्रस्फुटीत होत होती त्याच वेही एक साहित्य प्रेमी, संवेदनक्षम "संभा' काव्यअलंकार, शास्त्रपुराण, प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करीत होते. नीती, दंडनीत, धनुर्विद्या, इतिहास, राजकारण, राजा, मंत्री, सेना, प्रशासनापासून तर संत कबीर, रविदास, देव देवतांची चचित्रं, नृत्य, मुद्रा, ताल, लय, गती, सूर, या सोबतच अनेकविध कला साहित्याच्या चिंतन मनन लेखनातही दंग होते. विविधांगी अभ्यासाचा पिंड असलेला हा जागाच्या पाठीवर एकमेव राजपुत्र असावा. युद्धप्रशासन, राजकारण आणि भाषा कला व साहित्याचा असा समन्वय खरंच भारत भूमीत कुठं असू शकेल? राम आणि कृष्ण द्वापार त्रेतातील पण हा शंभू आजचा आहे, तुमच्या माझ्या कुनब्यातला.
वयाच्या 14 व्या वर्षी संस्कृत भाषेतून "बुधभूषण' ग्रंथाची निर्मिती संभाजींनी केली. त्याचबरोबर नखशिख, सातशतक, नायिका भेद हे हिंदी आणि ब्रजभाषेतील ग्रंथ संभाजी राजेंनी त्या वयात लिहून साहितयाची सेवा केली. ज्ञानेशांच्या प्रज्ञेची इथे तुलना नको. पण, एवढ्याशा वयात संभाजीची ही साहित्य सेवा अद्वितीय ठरते. युद्ध आणि साहित्याचा अनोखा व्यक्तीरंग संभाजी, आजच्या पिढीलाच नव्हे तर कुठल्याही पिढीतील तरूणाईला म्हणूनच संभाजी हे सर्वांगाणी आदर्श ठरावेत, यात मुळेच अतिशयोक्ती नाही. सुदृढ शरीर कमवावं लागतं. बलंदड शरीर, शरीराची उर्जा मेहनतीनी कमवावी लागते. यम, नियम, आसन, प्राणायम, ही त्याची पूर्वपीठिका असते. आहार विहार विचार आणि आचार त्यासाठी नियंत्रित असावेच लागता. विद्यंची आराधना करावी लागते. "विद्यातुरीणां न सुखं न निद्रा'. सर्व प्रकारच्या ऐशआरम सुखवृत्तीचा त्याग करतो, त्यालाच विद्या प्राप्त होते. संभाजींनी अनेक विद्यांची प्राप्ती केली ती या न्यायाने. शौर्य, पराक्रम, प्रशासन, राजकारण, साहित्य निर्मिती, स्वराज्याचा विस्तार, रयतेचं सुख आणि जनहित पालन यासाठी "तप' आवश्‍यक आहे. "तपसा प्राप्यते यश:' तपा शिवाय यश प्रापत होऊच शकत नाही. संभाजींनी यासाठी तपसिद्धी केली. म्हणूनच कार्यसिद्धी त्यांना प्राप्त झाली. परिस्थितीची प्रतिकूलता असातनाही हे साध्य करणं अत्यंत दुरापास्त आहे. तपाचा अर्थ अथक परिश्रम, इथे महत्त्वाचा ठरतो. तपाशिवाय माणसाची पत नसते. तप आणि पत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजच्या नैराश्‍यातील तरूणाईला संभाजी समजावा. मर्दासारखं जगायचं? संभाजी समजून घ्या.
जगायच मर्द होवून, मरणाला सुद्धा सामोरं जाता याव मर्दपणानं, संभाजी सारखं प्रतिकूल परिस्थितून मार्ग कसा काढावा तो संभाजी राज्यांसारखा. घरच्यांचा दुस्वास कितीही होवो. कुटीलांचे मनसुबे कसेही असू देत. चारित्र्य हननाचे प्रसंग कितीही असोत. जीवावर सतत बेतणारी जीवघेणी धूर्तता असू दे. जीव नकोसा करणोर प्रसंग कितीही असोत. या सर्व भीषण परिस्थिीतून तावून सुलाखून ध्येय निश्‍चितीचा बाणा संभाजींनी बाळगला. हा आदर्श आहे अष्ट प्रधानांचे कट कारस्थानाला दंडनीतीचा अवलंब करून कडक प्रशासनाची जरब बसविली. हे आपण विरणार का? घरातील सावत्र आईला पुत्रप्रेमाच्या राज्यपदाचा लोभ देवून किंवा तसा प्रसार प्रचार करून परहसते संभाजीला जीवानिशी मारण्याचे किती बेत करावेत आस्थिनीतील सापांनी? तीन वेळा हे कट उघडकीस येऊनही संभाजींची कडक समज देऊनही जेव्हा घरभेदी स्वार्थापोअी अंधानुकरण करते झाले, तेव्हा दंडनीतीच्या प्रशासनातील हत्यारं उपसली गेली. थोरल्या महाराजांच्या जीवाला जीव देणारी माणसं स्वातंत्र्योत्तर काळात रयतेला दु:ख देऊ लागणे, हे लांछन नव्हे काय? स्वराज्यापूर्वी घेतलेल्या आणाभाका आणि प्रतीज्ञा नंतर कां विरल्या जाव्यात? वतनासाठी वतनाशी गद्दारी करणाऱ्यांची संभाजींनी का गय करावी? स्वराज्याचं सुराज्य करणारी ही व्यवस्था, भ्रष्टाचार, सुखलोलुपता, स्वार्थांधता, अनागोंदी अजराजकतेकडे वळती होताना, किती दुर्लक्ष करावं? ही लाख मोलाची माणसं, त्यांनी स्वराज्यप्राप्तीसाठी केलेला त्याग, स्वातंत्र्योत्तर काळात भोगासाठी फितुरी करण्यात घालवावा, हे भीषण वास्तव नाही काय? परकीय असलेला औरंगजेबाच्या मुलाला "अकबर' याला वाचविण्यासाठी आलमगीर बादशहाचा रोष पत्करण्याची भीती झुगारणारा संभाजी आप्तस्वकीयांना मृत्यूदंडासारखी कठो शिक्षा कां देतो? फितुरी म्हणजे राजद्रोह रयतेच
्या हिता आड येणारांना शांती समाधानाची समजुतीची भाषा आणि प्रयत्न गळी उतरत नसतील तर राजांनी काय करावं? वत्रनात सुधार होत नसेल, चूक एकदा दोनदा क्षम्य केल्यानंतरही कट कारस्थानात मशगुल अष्टप्रधानातील प्रशासकांना, संभाजींनी दिलेला देहदंड अशोभनीय ठरत नाही. "राजा ना पृथ्वीपती', राजा हा रयतेचा विश्‍वस्त असावा. रयतेच्या भल्याआड येणारांची मग तो कितीही त्यागी आणि महान असला तरीही रयतेच्या शत्रूंना माफी नसावी, त्यांची मुरव्वत करता कामा नये. भूतकाळातील सूकर्म वर्तमानातील दुष्कर्माला किती अप्रुप ठरावेत? वर्तमानातील जगण्यासाठी सर्वांना सुख, शांती, स्वस्थता देणारी व्यवस्था ही सुराज्याची व्यवस्था. ती विस्कळीत करणाऱ्यांना दंडनीतीचा अवलंब आवश्‍यक असतो, हा संदेश संभाजींच्या या कृतीतून रयतेपर्यंत स्पष्ट उद्‌घोषित झाला.
वर्तमान तरूण पिढ्यांना 8-10 पिढ्यांआधीची जवळपास 350 वर्षापूर्वीची ही घटना आजही राज्य व्यवस्थेसाठी प्रेरणादायी ठरत नाही काय? अण्णाजी, हिरोजी या सारख्या महाराजांच्या सोबत्यांना मृत्यूदंड देतांना संभाजींना किती यातना झाल्या असतील? पण रयतेच्या आणि व्यवस्थेच्या हितासाठी त्याला पर्याय नसावा. रयतेचं सुख, राज्यावा विस्तार, मोहिमांची आखणी आणि पूर्ती करण्यात पुढचा काळ वादळी वाऱ्याच्या घोंघावात झपाटलागत पळत होता. कित्यक मोहीमा फत्ते तर कधी गतिरोधाला सामोरं जावं लागलं. जंजीरा अजूनही अनेकदा प्रयत्न करूनही सर होत नव्हता. त्यासाठी मध्ये एक चढाईची अनोखी पायरी शंभूराजांनी निर्माण केली होती. अनेक मुलुख स्वराज्यात सामील केले. त्रिचनापल्ली पर्यंत मोहीम फत्ते केल्यात. बुऱ्हाणपूरहून दौलत आणली. राज्य विस्तार झाला. रयतेला कडक प्रशासन आणि त्यांचा राजा मिळाला. लोकप्रियता प्रचंड वाढली. राजांना नजरभर पाहण्यात धन्यता मानणाऱ्यांची संख्या वाढतच होती. आलमगीर औरंगजेबाचे सर्व मनसुबे धुळीला मिहाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर छत्रपती संभाजीशी लढण्यात आता जवळपास 8 वर्षाचा कालावधी उलटला होता. निराश, हताश औरंगजेबाची प्रतीा पूर्ण होण्याचे सर्व मार्ग निमुळते होत होते. फंदफितुरी, कटाकरस्थान, प्रलोभनं काम करेनासे होत होते. लाखोंच्या वर यवनांच्या फौजेला खुद आलमगीराच्या हजेरीत दखनात एकही गढ किल्ला हस्तगत करता आला नाही. प्रशासनावरील जरब, अष्टप्रधानांवर अचूक वचक, येसूबाईची राज्यकारभारवर असलेली जीजा दृष्टी, राज्यशकट निर्धोक चालत असल्याची ग्वाही होती, संभाजी राजांना मोहिमेवर असतांना "सब ठीक ठाक है' ची आंतरग्वाही देत होती. मोहिमेवर असताना म्हणूनच राजांना "इकडली' फारसी काळजी नव्हती. आप्त स्वकीयांची चाललेली वतनं मिळविण्याचे खआटोप छत्रपती शिवाजीं
च्या काळापासून आजही मात्र छुप्या रितीने सुरूच होते. तो त्रास मात्र कायम होता. दुसऱ्या शत्रूंशी दोन हात करणं सोपं असतं. पण, घरातील नातलग आप्त संबंध ही बाब फार नाजूक आणि घातक ठरते. वतनं वाटण्याची प्रथा थोरल्या महाराजांनी बंद केलेली संभाजींनी सुरू करावी, अशी अनेकांची सुप्त इच्छा हाती. संभाजींनी महारजांचीच प्रथा सुरू ठेवली. सत्ता लोलुपता आणि नात्यांची दुर्बलता अशी कात्री होतीच. येसुबाईचे कान हे ऐकून आताशा बधीर झाले होते. परंतु गणोजी शिर्के या आपल्या बंधूकडून होत असलेल्या ईनामी वतनाच्या मागणीनी, येसुबाई त्रस्त होत्या. निर्वाणीच्या शब्दात सांगूनही बंधू राजेंचे बेताल बोलने बंद होत नव्हते. दगाफटका तर होणार नाही ना अशी शंकेची पाल कधी चुकचुकत असे. मनचिंती ते वैरी न चिंती, अशुभाची कल्पनाही अंगावर काआ आणतो. शरीराला त्राणहीन करते. औरंगजेबाच्याप्रचंड सैन्याला संभाजींची सेना आजवर पुरून उरली होती. आमोरा समोरीपेक्षा डोंगर चढ उतरणीचं युद्ध निपूर्ण असलेली, संभाजींच्या मलकापुरी सैन्यातील तरूण योद्धे क्षणात विजेसारखे आता इथं तर क्षणार्धात दुसरीकडे दिसत. या सेनेचा प्रचंड धसका मागेल सैन्यांनी घेतला होता. त्यामुळे मराठ्यांच्या राज्यातून हात हलवत तसंच परत जावं लागणार, ही भीती औरंगजेबाला वेडा करून सोडीत होती. क्षणोक्षणी जळी, काष्टी, पाषाणी शिवाजींच्या दहशती सारखे आता त्याला संभाजी दिसत होते. सैन्यांनी संभाजीचा इतसका धसका घेतला होता, की "शेर का बच्चा काहॉ से आएगा मालुमही नही होता, अरे वो तो हवा का नाम है संभा' चपळता घेरेबंदी आणि गनिमी युद्धात तरूण मावळे निपूण होते. प्रत्यक्ष युद्धात संभाजींना जिंकण अशक्‍य असल्यामुळे फितुरीचं हत्यार तेवढं चालवायच असं ठरलं. घात लावल्या गेला. संभाजींचा साळा येसूबाईचा भाऊ गणोजी शिर्के शेवटी गळाला लागला. त्यांनी कट रचून आ
लमगिरीला माहिती पुरवून राजे संभाजींना पकडून देण्यात मदत केली. संभाजींना घात लावून पाळत ठेवून फंद फितुरीनी पकडण्यात आले. बादशाहाला धन्यता वाटली. थोर माणसांचं रणांगणावरील कर्तृत्व घरातील घरभेद्यांमुळे पराभूत होण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. घनघोर घात झाला. आपल्या घरातील माणसांनी घात केला. औरंगजेबांनी संभाजी राजांना भरपूर प्रलोभनं दाखविली. स्वाभीमानाची किंमत आपला प्राण देऊन राजांनी चुकती केली. औरंगजेबाला शेवटी पराभूत व्हावं लागलं. अत्यंत क्रूरपणानं संभाजींच्या देहाच्या खांडोळ्या खांडोळ्या करून, कातडी सोलून, रक्तामासाचे तुकडे करून फेकून देण्यात आले. त्यांचा अग्निसंस्कार होवू नये म्हणून दवंडी पिटविली. एका परीट स्त्री मुळे गावातील महिला पुढे होऊन गावकऱ्यांच्या मदतीने रात्री त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आला. राष्ट्रासाठी, स्वामीमानासाठी, राष्ट्रवादासाठी, रयतेसाठी, धर्मासाठी अवघ्या वयाच्या 32 व्या वर्षी शंभूराजे शहीद झाले. आजच्या पिढीच्या तरूणाईंनी नवचेतना स्फुर्ती घेण्याचा तो बलिदान दिवस स्वातंत्र्याचं सुराज्य करण्याचे स्वप्न बाळगून छत्रपती शिवाजींनी दिलेला वारसा स्वाभीमानाने जगणाऱ्या ध्येयवेड्या तरूण छत्रपती संभाजींची वीरगाथा, आजच्या पिढीला आदर्शवत आहे. आज या मरगळ आलेल्या तरूण पिढीला जीवन जगण्याचा आदर्श मार्ग संजीवन म्हणजे संभाजी राजे.
संभाजी राजे कसे होते? असा प्रश्‍न उपस्थित झाल्यास प्रत्येक तरूणाईचं उत्तर असावं :-

-------
"स्वाभिमानाचा संबळ, संभाजी
धर्माचा आदर, संभाजी
राष्ट्रवादाचा जागर, संभाजी
शिवसईचा पूत्र, संभाजी
जीजाऊंचा कुसव, संभाजी
तरूणाईचा गर्व, संभाजी
मर्दांचा मर्द , संभाजी
कुटीलांचा नाशक, संभाजी
कलेचा उपासक, संभाजी
साहितय निर्मिक, संभाजी
येसूंचा विश्‍वास, संभाजी
रयतेचा राजा, संभाजी
मरणाचा उजाळा, संभाजी
ज्ञानीयांचा ज्ञाना, संभाजी
सिंहाचा छावा, संभाजी
तेजाचा पुतळा, संभाजी
नीतीचा दंडक, संभाजी
सत्याचा रक्षक, संभाजी
जागता राजा, संभाजी'
अशा या "जागता राजा संभाजी' या कोटी कोटी दंडवत.

----------