Sunday, January 23, 2011

दुष्मनाने दुष्मनाची केलेली तारीफ


मराठ्यांना इतिहास घडवायचे माहीत होता. पण आपण घडवलेला इतिहास आपला पराक्रम लिहिणे त्यांना कधी जमले नाही पण ज्यांना मराठ्यंनी सळो की पळो करून सोडले त्या विजापूर दरबाराचा कवी असतो की फिरंग्यांचा एखादा लेखक. मराठ्यांचा इतिहास अतिशय समर्पक वाक्यात वर्णन करतात. स्वतः औरंगजेब आपल्या राजाचे गुणगान गातो मग हे तर ...........




दुश्मनाने दुष्मनाची केलेली तारीफ जरूर ऐका




विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."



दक्षिणदिग्विजय मोहिमेदरम्यान फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये अशी नोंद घेतो

No comments:

Post a Comment